झुलन गोस्वामीच्या निरोप समारंभाचे भावुक क्षण!

महिला भारतीय संघाची आघाडीची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अखेरचा सामना खेळत आपल्या २० वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीला अलविदा केले.

झुलन गोस्वामीनं आतापर्यंत १२ कसोटी, २०३ एकदिवसीय आणि ६८ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय.

दोन दशके भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व करताना तिने जागतिक क्रिकेटमध्ये अमीट ठसा उमटवला आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून तिने ३५२ हून अधिक बळी मिळवले आहेत.

भारताच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरित करत नवा मार्ग दाखवला आहे. झुलनकडून प्रेरणा घेऊन आता भारतातील अनेक मुलींनी क्रिकेटपटू होण्याचे आणि तिच्याप्रमाणे वेगवान गोलंदाजी करण्याचे स्वप्न बाळगले आहे.

काही महिन्यांपूर्वी मिताली राज आणि आता झुलन, या दोन दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीमुळे भारतीय महिला क्रिकेटमधील एका पर्वाची खऱ्या अर्थाने अखेर झाली आहे.

२० वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत झुलनला अनेक विश्वचषकांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. तिचा समावेश असलेल्या भारतीय संघाने २००५ आणि २०१७च्या महिला एकदिवसीय विश्वचषकांची अंतिम फेरी गाठली होती

भारतीय संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडवर इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच ३-० अशी मालिका जिंकली. याधी १९९९ साली त्यांनी २-१ अशी मालिका जिंकली होती.

सामन्याआधीच्या संघ मिटिंगमध्ये सर्व महिला खेळाडू एकत्र येऊन तिला निरोप देत होत्या. त्यावेळी अनेकींना आपल्या भावना अनावर झाल्या. यावेळी प्रत्येक खेळाडूने झुलनविषयी मत मांडले.

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही झुलनला आपल्या सोबत नाणेफिकीसाठी घेऊन गेली होती. यावेळी तिला देखील अश्रू अनावर झाले. तिने झुलनला कडकडून मिठी मारली.