Bullet Train in India: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेनबाबत मोठे वक्तव्य केले आहे. बुलेट ट्रेन (Bullet Train in India) हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्याचे काम वेगाने सुरू आहे. त्याच्या डिझाईनला वेळ लागत असून इतर सर्व कामे वेळेवर होत असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
Bullet Train in India: काय म्हणाले रेल्वे मंत्री?
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी टाईम्स नाऊ समिटमध्ये बुलेट ट्रेनबद्दल बोलतांना सांगितले की, बुलेट ट्रेनच्या डिझाइनला वेळ लागत आहे. ते म्हणाले, “तुम्ही कुठलाही देश घ्या जिथे पहिली बुलेट ट्रेन बनली असेल, पहिली बुलेट ट्रेन (Bullet Train in India) बनवायला वेळ लागला कारण तिची रचना खूप अवघड आहे. जर बुलेट ट्रेन 320 किमी/तास वेगाने धावणार असेल, तर ती नियंत्रित करण्यासाठी आणि सिस्टीम तयार करण्यासाठी वेळ लागतो”.
हे ही वाचा: आंतरराज्यीय सीमा विवाद: या ८ राज्यांमध्ये आहेत विवाद
Bullet Train in India: कशी आहे प्रगती?
अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, 110 किमीचे काम पूर्ण झाले आहे. ते म्हणाले, “गेल्या वर्षी त्याची पहिली पायाभरणी झाली होती आणि त्यानंतर सुमारे 110 किमीचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षभरात हा प्रकार घडला. जर आपण एका वर्षातील कामाचा दर पाहिला तर तो कदाचित जगातील इतर देशांपेक्षा चांगला असेल. सर्व काही वेळेवर चालू आहे आणि ते 2026 पर्यंत चालेल. पर्यावरणाचा विचार करून ट्रेनची रचना करण्यात येत असल्याने या गाडीच्या डिझाइनला थोडा वेळ लागत आहे. बाकी सर्व काही वेळेवर चालू आहे.
महाराष्ट्र सरकारने दिली जमीन
सत्तेत आल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मधील जमीन केंद्र सरकारकडे सुपूर्द केली आहे. मात्र, यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ला जवळपास दुप्पट किंमत मोजावी लागणार आहे.
2018 मध्ये, NHSRCL जमिनीसाठी 3,513.37 कोटी रुपये देईल, ज्यामध्ये जमिनीवर 0.9 हेक्टर आणि जमिनीखालील 3.3 हेक्टरचा समावेश असेल असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एमएमआरडीएने (MMRDA) एनएचएसआरसीएल (NHSRCL) कडे ८,८८९.७२ कोटी रुपयांची मागणी केली होती. यापैकी 4,387.98 कोटी रुपये जमिनीच्या वरच्या 1.52 हेक्टर आणि जमिनीच्या खाली 3.32 हेक्टर अधिक आहे.
तीन वर्षात या ४७५ वंदे भारत एक्सप्रेसची योजना
यावेळी बोलतांना रेल्वे मंत्र्यांनी वंदे भारत एक्सप्रेस बद्दलही माहिती दिली. आगामी काळात भारतीय रेल्वे प्रवाशांना जलद प्रवासाचे पर्याय देण्याच्या तयारीत आहे. भारताला अलीकडेच वंदे भारत एक्स्प्रेसच्या रूपात दोन सेमी-हाय-स्पीड ट्रेन्स मिळाल्या आहेत. रेल्वेमंत्र्यांनी पुढे असे ही सांगितले की येत्या ३ वर्षात म्हणजेच 2025 पर्यंत भारतात एकूण 475 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या असतील. तीन वर्षात या ४७५ गाड्यांच्या निर्मितीची योजनाही मार्गावर आहे. अर्थसंकल्पात 400 गाड्यांना मंजुरी देण्यात आली होती आणि त्यापूर्वी 75 गाड्यांना मंजुरी देण्यात आली होती. येत्या तीन वर्षांत आम्ही संपूर्ण उद्दिष्ट साध्य करू,” असे ते म्हणाले.
रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाबाबत मंत्री म्हणाले की, 138 स्थानकांसाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे, तर तब्बल 57 स्थानकांसाठी डिझाइन्स अंतिम करण्यात आले आहेत.